76 Sad Status in Marathi | बेस्ट सैड स्टेटस मराठी मध्ये

You are currently viewing 76 Sad Status in Marathi | बेस्ट सैड स्टेटस मराठी मध्ये

Sad Status in Marathi – आयुष्य म्हंटले कि चढ उतार हे आलेच जीवनात प्रतकालाच सुख दुःखाला सामोरे जावे लागते. जसे आपण सुख सगळ्यांसोबत वाटो तसेच दुःख हि कोणाजवळ तरी मोकळे करतो,  पण कधी कधी दुःख व्यक्त करण्यासाठी कोणी नसते. मग अशा वेळ शब्दांचा आधार घेऊन (स्टेटस किंवा मेसे द्वारा आपण आपले दुःख व्यक्त करत असतो. मन मोकळे करण्यासाठी सोशिअल मीडिया द्वारा तुम्ही आपले मन मोकळे करू शकता ह्यासाठी आम्ही काही स्टेटस , quotes घेऊन आलो आहोंत.

Sad Status Marathi

Sad status in Marathi - Marathivishva

त्याला जायचं होत तो गेला 

मला गमवायच होत मी गमावलं,

फरक फक्त एवढाच,

त्याने  जीवनाचा एक क्षण गमावला

आणि मी एका क्षणात जीवन

तू दिलेल्या दुःखाने,

मला बरेच काही शिकवले,

जग हे कसे असते,

शेवटी तूच मला दाखवले

शरीराला जखम झाली तर 

फक्त रक्तच बाहेर येतं पण 

अश्रूंना बाहेर येण्यासाठी 

मनाला जखमी व्हावं लागतं

ज्या लोकांची आपण जास्त काळजी करतो 

कायम तेच लोकं आपल्याला विसरून जातात

श्वास थांबल्यानंतर

माणूस एकदाच मरतो

पण जवळच्या व्यक्तीने साथ

सोडल्यावर माणूस रोज रोज मरतो

Sad Quotes in Marathi

Sad Quotes in Marathi - Marathivishva

प्रेमात तर चेहरा सगळेच बघतात 

पण जे लोकं मन बघतात 

ते खूप नशीबवान असतात

कोसळणारा पाऊस पाहून,

मला नेहमीच एक प्रश्न पडतो,

माझे तर ठीक आहे,

पण हा कोणासाठी रडतो.

आयुष्यात काही क्षण असे असतात की

त्यावेळी प्रश्न नाही फक्त साथ हवी असते

विसरायचं म्हंटले कि 

जास्तीच आठवू लागते

त्या माणसाची काळजी करणं सोडा,

ज्यांना तुमची काळजी नाही

मन गुंतायाला हि वेळ लागत नाही

आणि मन तुटायला हि वेळ लागत नाही

वेळ लागतो फक्त ते गुंतलेले मन आवरायला

आणि तुटलेले मन सावरायला.

असं म्हणतात जोड्या स्वर्गात जुळतात

मग असे परक्यात जीव का अडकतात

आत्मविश्वाला तडा गेल्यावर कोणताच मार्ग उरत नाही, 

सगळीकडे अंधार मग प्रकाश कुठेच राहत नाही

रक्ताच्या नात्यांना मान पान द्यावा लागतो

मनाने जोडलेल्या नात्यांना एक smile

पण पुरेशी असते

कधी कधी आपण खरंच हरतो

नाती निभावता निभावता 

काळजी करता करता

Sad Messages in Marathi

तू आणि मी समुद्राचे दोन किनारे

कधी हि भेटू न शकणारे

पण एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे.

 प्रेम कधीच चुकीचे नसते 

कदाचित निवड चुकीची असू शकते.

नात्यात सवांद महत्वाचा आहे

नाहीतर फक्त वाद होतात.

वहीच्या कप्प्यातल्या

पाकळ्या त्या सुकल्यात

अन मनाच्या कप्प्यात

फक्त आठवणी उरल्यात.

अशाच एका सायंकाळी

तुझी आणि माझी भेट व्हावी

चंद्र आणि लाटांच्या साक्षीने

आपली पुन्हा नव्याने ओळख व्हावी.

तू माझी आहेस असं म्हणणारा 

माझा कधी झालाच नाही.

मनावर घाव घालून 

तो शरीरावर जखमा शोधत होता

वेदनेने वाहणाऱ्या अश्रुना

तो खोटं पडत होता.

सावरावे म्हणते स्वतःला

तरी तुज्या आठवणीत तोल जातोच.

आठवणींचा पसारा 

घेतलं होता आवरायला 

तू नाही पण त्याच होत्या मला सावरायला

Love Sad Status in Marathi

मन माझे जळताना

वेदना तर होत  होत्या

वाईट ह्याच वाटते

त्या कोणाला कळत नव्हत्या.

जवळीक साधून माझ्याशी कशी किमया केलीस, 

वेड लावून मला माझ्या आयुष्यातून का गेलीस.

माझ्या अश्रूंची किंमत तुला 

कधीच नाही कळली 

म्हणूनच तुझ्या प्रेमाची नजर 

नेहमी दुसरीकडे वळली.

मी मनसोक्त रडून घेते,

घरात कुणी नसल्यावर.

मग सहज हसायला जमतं,

चारचौघात बसल्यावर.

तुझ्यात आणि माझ्यात,

फक्त थोडाच फरक होता.

तुला वेळ घालवायचा होता,

आणि मला आयुष्य.

होईलच तुला एक दिवस सये

माझ्या भोळ्या प्रेमाची जाणीव ,

भ्रमर कुणी जाता हात सोडून

भासेल तुला फक्त माझीच उणीव .

मन समजून घेण्यासाठी असते

आणि लोक त्यासोबत खेळून जातात.

कापरासारखं जळणं मला कधीच पटत नाही, 

तसं जळण्यास माझी ना नाही, 

पण शेवटी काहीच उरत नाही.

Life Sad Status in Marathi 

जगाची रीतच न्यारी आहे,

इथे सगळ्यांना आपली प्रितच प्यारी आहे,

मी म्हणत नाही शेवटपर्यंत साथ दे,

पण शक्य आहे तोपर्यंत,

तरी माझा हातात हात घे.

प्रेम शब्द आहे छोटा 

पण अर्थ आहे लाख मोलाचा.

माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल,

रात्रभर नाही,

पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.

मिठी या शब्दात केवढी मिठास आहे, 

नुसता उच्चारला तरी कृतीचा भास आहे.

खरंच सांगितलय कोणीतरी एकट राहणं शिकून घ्या 

प्रेम कितीही खरं असू द्या साथ सोडून देतच.

कोणाला कितीही जीव लावला तरी

ते आपली लायकी दाखवून जातात .

जवळची नाती ही माणसाला,

कधी कधी खूप छळतात,

जितके जास्त जपाल तितके,

आपणाला आणखी दुर लोटतात.

सोडून दिले मी

नशिबावर विश्वास ठेवणे

कारण जे हृदयात असतात

ते नशीबात नसतात…

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे,

आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम

करतो तिच्या शेजारी बसने.

आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार

नाही याची जाणीव होणे.

कधी कधी आयुष्यात

अशा गोष्टी सुध्दा घडून जातात की

आपण त्याचा विचार सुद्धा

करू शकत नाही.

जीवापाड प्रेम केल्यावर कळत की,

प्रेम म्हणजे काय असतं,

तुम्ही प्रेम कोणावरही करा,

पण ज्याच्यावर कराल त्याच्यावर

अगदी शेवटपर्यंत करा.

वाईट वेळ नेहमी

आपल्या माणसांची ओळख

करून देण्यासाठी येते

ज्यांची आपण चिंता करतो 

कायम तेच लोक आपल्याला समजत नाहीत

ज्या क्षणी तुला वाटेल कि,

हे नात तोडण्याची वेळ आली आहे

तेव्हा स्वतःच्या मनाला हे एकदा जरूर विचार कि,

हे नात एवढा काळ का जपलं

पाउस तर पडतोच माझ्याकडे 

कधी ढगातून तर कधी डोळ्यातून

कोणाची आठवण येणं कठीण नाही

कठीण आहे ते म्हणजे मरेपर्यंत साथ देणे

तो आपला कधीच होणार नाही 

हे माहित असूनही प्रेम करत राहणे 

म्हणजेच खर प्रेम असते

आठवणी विसरता येतात पण 

प्रेम विसरता येत नाही

कुठेही रहा पण सुखात रहा,

सुख माझे त्यात आहे,

स्वतःचा जीव जपत रहा,

कारण जीव माझा तुझ्यात आहे.

कोणी कोणासाठी असं फक्त म्हणायचं असतं, 

मनात मात्र कोपऱ्यात तिच्यासाठी झुरायचं असतं

परकचं करायच होत

तर जवळ का गं घेतलस ?

विश्वासच नव्हता तर

प्रेम का गं केलस ?

आवडत्या व्यक्तीला

आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा,

आवडत्या व्यक्तीसाठी

इगो सोडणं केव्हाही चांगलं.

प्रेम त्याच्यावर करावं 

ज्याचं आपल्यावर प्रेम आहे

रात्रीच्या एकांतामध्ये

कोणी आठवण काढत

पण जे खर प्रेम असत ना

ते सकाळी उठल्या उठल्या

पहिला मेसेज तुम्हाला करत

खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच मिळते, 

त्याचे मोल मात्र ते निसटल्यावर कळते

माझ्यासारखा आज तूही अस्वस्थ असशील, 

रात्रभर नाही पण क्षणभर तरी 

माझ्यासाठी जागा असशील

भावनांशी खेळायला इथे

प्रत्येकाला जमतं

आपल काम झालं

नातं आपोआप संपत

नाती ही झाडांच्या पानांसारखी असतात, 

एकदा तुटली की 

त्यांची हिरवळ कायमची निघून जाते

कधी कधी खूप

दूर पर्यंत जावं लागतं..

हे बघण्यासाठी कि,

आपलं जवळचं कोण आहे

कितीही

आनंदी राहायचा प्रयत्न करा

जेव्हा कोणाची आठवण येते ना

तेव्हा रडायला खुप येते

गळून गेलेल्या पाकळ्या

जशा पुन्हा जुळत नाही,

तसेच मनातून उतरलेले काहीजण

पुन्हा मनात भरत नाहीत

डोळ्यातून अश्रू पडले 

कि आवाज होत नाही

पण मान मात्र हलकं होते

कोणी मनासारखं जगत असतं 

तर कोणी दुसऱ्याचं मन जपून जगत असतं

नेहमीच आनंद मिळेल असे नाही,

कधी कधी दुःख पण सोसावे लागते,

कितीही अहंकारी असाल तरीही,

प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते.

 माणूस कधी आपल्या मर्जी ने शांत नसतो 

कोणी तरी खूप त्रास दिलेला असतं

अस वाटायला लागलेय की

जेव्हा देव माझं नशिब

लिहत होता

तेव्हा त्याचा मूड खराब होता

जाता जाता ती सांगून गेली,

काळजी घेत जा स्वतःची,

पण तिचे डोळे सांगत होते की,

आता माझी काळजी कोण घेणार

मावलं मी पण होतं, गमावलं तिने पण होतं,

फरक फक्त एवढा आहे ?

तिला मिळविण्याकरीता मी सर्व काही गमावलं,

अन, तिने सर्व काही मिळविण्याकरीता मला गमावलं.

सगळेच धडे पुस्तकात मिळत नाही

काही धडे आयुष्यात पण मिळतात

जवळची नाती माणसाला खूप छळतात

जवळ गेलं कि जास्ती दूर लोटतात

एकटं चालणे कठीण असले तरी

तेच बेस्ट असते

एके दिवशी माझा श्वास बंद होईल

नको विचार करूस कि माझे प्रेम कमी होईल

अंतर फक्त एवढंच असेल

आज मी तुझी आठवण काढत आहे.

उद्या माझी आठवण तुला येईल

Leave a Reply